मुस्लीम लीग

०१. १८५७ च्या उठावात प्रामुख्याने मुस्लिम आघाडीवर होते. त्यामुळे इंग्रजांनी १८७० पासून मुसलमानांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. फुटीरतेची भावना जोपासणे व वाढविण्याचे कार्य मुस्लीम नेते सर सय्यद अहमद खान यांनी केले. त्यांनी १८७५ मध्ये अलीगढ येथे ‘मोहमेडन अ‍ॅग्लो ओरिएंटल कॉलेज’ची स्थापना केली. तेच पुढे मुस्लीम फुटीरवादी राजकारणाचे प्रमुख केंद्र बनले.
०२. सय्यद यांनी १८८६ ‘मुस्लीम एज्यूकेशनल कॉन्फरन्स’ संघटना स्थापन केली व समाजाचे ऐक्य घडवून आणले. प्राचार्य बेकच्या सल्ल्यानुसार सय्यद यांनी १८८८ मध्ये ‘इंडियन पैट्रीऑटिक असोसिएशन’ संघटना स्थापन केली. कॅाग्रेसशी आपला संबंध नाही. इंग्रज हेच खरे मित्र आहेत हि भावना रुजविण्याचा प्रयत्न वरील मुस्लीम संघटनांनी केला.
०३. राष्ट्रीय प्रवाहापासून मुसलमानांना दुर ठेवून हिंदु मुस्लीम यांच्यात फुट पाडणे हे इंग्रजांचे ध्येय होते. यातूनच लार्ड कर्झनने १९०५ मध्ये बंगालची फाळणी केली. त्याला भारतीयांनी विरोध केला. बंगालमध्ये वंगभंग चळवळ सुरु झाली. त्यामळे व्हाइसरॉय लॉर्ड मिंटोने आपल्या अधिकार्‍यामार्फत मुस्लीम नेत्यांना कळविले की मुस्लीम शिष्टमंडळाने भेट घेऊन राजकीय मागण्या कराव्यात.
०४. त्यानुसार १९०६ मध्ये आगाखानच्या नेतृत्वाखाली सिमला येथे शिष्टमंडळ भेटले आणि मागण्याचे निवेदन दिले.मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदार संघ असावा, सरकारी नोकर्‍यामध्ये गवर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये राखीव जागा असाव्यात, स्पर्धा परीक्षा न घेता सेवेत उच्च पदावर नियूक्ती करावी अशा मागण्या त्यांनी केल्या.
०५. लॉर्ड मिंटोच्या भूमिकेमुळेच मुस्लीम नेत्यांनी १९०६ मध्ये ढाका येथे मुस्लीम लीगची स्थापना केली. या संघटनेचा उद्देश ब्रिटिश सरकारशी एकनिष्ठ राहणे, भारतीय मुसलमानांचे संरक्षण व संर्वधन करणे, सरकारकडे मागण्या करून त्या मान्यतेसाठी आग्रह धरणे हा होता.
०६. सिमला करारानुसार मुसलमानांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. त्यासाठी १९०९च्या कायद्यात त्यांना कॉर्पोरेशन, विद्यापीठे यामध्ये राखीव जागा दिल्या.
०७. बंगालच्या फाळणीमुळे भारतीय समाज दुखावला होता. क्रांतिकारी चळवळी वाढल्या होत्या. त्यांनी अनेक इंग्रज अधिकार्‍यांना ठार केले. त्यामूळे १९११ मध्ये बंगालची फाळणी रद्द झाली. 
०८. खलिफा प्रकरणामुळे भारतीय मुसलमान इंग्रजांबदल नाराज होते. त्यांनी इंग्रजांच्याविरूध्द खलिफाला वाचविण्यासाठी खिलाफत चळवळ सुरु केली. लखनौ येथे कॉग्रेस व लीगचे ऐक्य होऊन करार केला गेला. 

०९. त्यानुसार गवर्नर जनरलच्या मंडळात निम्मे सभासद लोक नियूक्त हिंदी असावे. त्यांची निवड केंद्रिय कायदेमंडळाकडुन व्हावी, केंद्रिय कायदेमंडळात ४/५ पैकी १/३ मुस्लीम लोक नियुक्त सभासद असावेत. अशा मागण्या केल्या गेल्या.

१०. पहिल्या महायुध्दानंतरही इंग्रजांनी तुर्कस्थानविरुध्द युध्द सुरु केले. त्यामुळे मुसलमानांनी चळवळ सुरु करण्याचा निर्णय घेतला. तर कॉग्रेसला असहकार चळवळ सुरु करावयाची होती. दोघांनी एकत्र येऊन खिलाफत व असहकार चळवळ करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे खिलाफत चळवळीत कॉग्रेस सहभागी झाली. मात्र चौरीचौरा प्रकरणामुळे असहकार चळवळ बंद केली गेली. त्यामूळे आपला कॉग्रेसने विश्र्वासघात केला असे लीगला वाटू लागले.

* पाकिस्तानची कल्पना

०१. सायमन कमिशनने स्वतत्र मतदार संघाऐवजी अल्पसंख्याकास राखीव जागा द्याव्या आणि सिंध प्रांतास स्वतंत्र दर्जा द्यावा अशी शिफारस केली. याला कॉंग्रेसने विरोध करून नेहरू रिपोर्ट सादर केला. तो लीगने फेटाळला. मुस्लिमांच्या हितासाठी नेत्यांशी चर्चा करुन बॅ. जिनांनी १९२९ मध्ये चौदा सुत्री योजना मांडली. 

०२. मुस्लीम लीगच्या १९३० च्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. अल्लामा मुहम्मद इकबाल यांनी वायव्य मुस्लिमांसाठी स्वतंत्र राज्य असावे अशी मागणी केली. त्याचवेळी केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थी चौधरी रहमत अली यानी हिंदुपासुन मुसलमानांची पिळवणुक होईल. त्यासाठी स्वतंत्र राष्ट्राची गरज आहे. असे मत मांडले.

०३. दुसर्‍या गोलमेज परिषदेमध्ये सांप्रदायिक प्रश्नावर एकमत न झाल्याने रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी १६ ऑगस्ट १९३२ रोजी ‘जातीय निवाडा’ योजना जाहीर केली. त्यानुसार मुसलमान, दलित, ख्रिश्चन, शीख यांना अल्पसंख्यांक मानून त्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले. जातीय निवाड्यामुळे समाजात दरी निर्माण होऊन पाकिस्तानच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु झाले.
०४. १९३५ च्या कायद्याने १९३७ मध्ये प्रांतीय निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत १८८५ पैकी ७११ जागा कॉग्रेसने तर ४८९ पैकी १०४ जागा लीगला मिळाल्या. आठ राज्यात कॉग्रेसचे मंत्रिमंडळ स्थापन झाले.

* पाकिस्तानची निर्मिती

०१. दुसर्‍या महायुध्दाच्या काळात कॉंग्रेस व लीग यांच्यात ऐक्य करण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला. परंतु ते शक्य झाले नाही. याच वेळी लीगने कॉंग्रेसकडे अनेक मागण्या केल्या. संघराज्य नष्ट करावे, मुसलमानांचे रक्षण करणारी घटना बनवावी, प्रांतीय सरकारममध्ये लीगला प्राधान्य द्यावे आणि वंदे मातरमवर बंदी घालावी अशा मागण्या लीगने केल्या. काँग्रेसने याला नकार दिला.
०२. क्रिप्स योजनेच्या तरतुदीत भारताच्या फाळणीची बिजे दिसत असल्याने विभाजनवादाच्या लीगच्या अपेक्षा वाढल्या. १९४२ च्या चळवळीत लीगने भाग न घेता सरकारची बाजू घेऊन काँग्रेस विरोधी भूमिका घेतली. भारतापासून वेगळे होण्यास जनतेने सार्वमत घ्यावे. यामुळे राजाजी योजना लीगने फेटाळुन लावली.पाकिस्तानच्या मुदयावर १९४४ मध्ये गांधी-जिना आणि भुलाभाई देसाई व लियाकत अली यांच्यातील वाटाघाटी फिस्कटल्या.
०३. लॉर्ड वेव्हेल याने सिमला परिषदेत कार्यकारिणीतील सर्व मुसलमान प्रतिनिधी केवळ लीगचेच असले पाहिजेत असा आग्रह धरला. यामुळे परिषद अयशस्वी ठरली.
०४. त्रिमंत्री मंडळानी १९४६ मध्ये स्वतंत्र पाकिस्तानची मागणी फेटाळली आणि भारताचे तीन विभागात विभाजन केले.
०५. बॅ. जिनांनी पाकिस्तानच्या निर्मितीच्या ध्येयासाठी १६ ऑगस्ट १९४६ हा प्रत्यक्ष कर्यावाहीचा दिवस म्हणून पाळला. या दिवशी दंगल झाली. ५ हजार लोकांची कत्तल कोलकत्यास झाली.
०६. नेहरूच्या नेतृत्वाखाली २ सप्टेंबर १९४६ रोजी हंगामी सरकार स्थापन झाले. लीगने तो दिवस शोक दिन म्हणून पाळला.

०७. ब्रिटिश पार्लमेंटने ३ जून १९४७ रोजी फाळणीची योजना जाहीर केली. त्यानुसार १८ जूलै १९४७ ला स्वातंत्र्याचा कायदा पास झाला १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तान भारतापासून अलग झाला.

भारताचे स्वातंत्र्य व फाळणी – भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

फाळणीनंतरच्या समस्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.