गुवाहाटीमध्ये ‘ट्वीन टॉवर ट्रेड सेंटर’ उभारण्यासाठी सामंजस्य करार 
गुवाहाटीमध्ये आसाम राज्य शासन आणि राष्‍ट्रीय इमारत बांधकाम महामंडळ (NBCC) यांच्यात प्रस्‍तावित ‘ट्वीन टॉवर ट्रेड सेंटर’ (व्‍यापार केंद्र) उभारण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या झाल्या आहेत.

भारत सरकारच्या ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणाचा भाग म्हणून चीन, भूटान, बांग्‍लादेश आणि म्‍यानमार लगतच्या भारताच्या ईशान्य क्षेत्राच्या विकासासाठी जवळपास ४५००० कोटी रुपये गुंतविण्याची योजना तयार केली गेली आहे.

राष्‍ट्रीय इमारत बांधकाम महामंडळ (NBCC) ही शहरी विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी एक नवरत्न बांधकाम कंपनी आहे. 

NBCC ची स्थापना १९६० साली झाली आणि याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. देशात याचे १० प्रादेशिक/विभागीय कार्यालये आहेत. NBCC इतर देशांमधील प्रकल्पांचेही बांधकाम हाती घेते.



पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित ‘एक्झॅम वॉरीयर’ पुस्तकाचे प्रकाशन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहीलेल्या ‘एक्झॅम वॉरीयर’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तकाचे ‘पेंग्विन पब्लिशर’ हे प्रकाशक आहेत.
हे पुस्तक विद्यार्थ्यांना समर्पित आहे, जे परीक्षेदरम्यान ताण आणि चिंतेचा सामना करतात. 

या पुस्तकात ताण कमी करण्यासाठी विविध पद्धतींचा उल्लेख केला आहे. यामध्ये योगाभ्यास करण्याच्या विविध साधनांचा उल्लेख केला गेला आहे.



जहाजांच्या विकासासाठी CSL चा रशियाच्या USC कंपनीसोबत करार
कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) आणि रशियाची यूनायटेड शिपबिल्डिंग कार्पोरेशन (USC) यांच्यात आंतर्देशीय व तटीय जलमार्गांसाठी समकालीन अत्‍याधुनिक जहाजांची संरचना, विकास आणि कार्यान्‍वयन यामध्ये सहकार्य चालविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

CSL ला USC उच्‍च गतीचे जहाज, नदी-सागरी मालवाहू गलबत, प्रवासी जहाज, ड्रेजर, आंतर्देशीय जलमार्ग आणि तटीय जहाजरानी यांच्या भारतामध्ये विकासात सहकार्य करणार आहे.


ICC अंडर-१९ विश्वचषक भारताने जिंकला
१३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१८ या काळात न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या ‘ICC अंडर-१९ विश्वचषक २०१८’ स्पर्धेचे विजेतेपद भारताने जिंकले आहे.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने चौथ्यांदा हा चषक जिंकलेला आहे.

स्पर्धेचा मालिकावीर खेळाडू म्हणून भारताच्या शबमन गिल ला घोषित करण्यात आले.



जागतिक पाणथळ भूमी दिवस २ फेब्रुवारी
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २ फेब्रुवारी रोजी जगभरात ‘जागतिक पाणथळ भूमी दिवस (World Wetlands Day)’ पाळला गेला आहे. यावर्षी हा दिवस ‘वेटलँड्स फॉर ए सस्टेनेबल अर्बन फ्युचर’ या संकल्पनेखाली आयोजित केला गेला. 

पाणथळ प्रदेश हा समुद्र किंवा भूमीप्रदेश याजवळ सापडतो आणि तो हंगामीही असू शकतो. त्या प्रदेशात वर्षातील काही महीने किंवा बारमाही काळात पाणी भरलेले असते. ते पर्यावरणात एक महत्वपूर्ण भूमिका बजावतात जसे की, पुराचे पाणी सामावून घेतात, येथे माश्यांना पाण्यातील वनस्पती खाद्य म्हणून पुरवते, प्राण्यांना निवारा देते, तळाशी जमणारा गाळ काढून पाणी शुद्ध करते.

‘जागतिक पाणथळ भूमी दिवस’ हा पहिल्यांदा २ फेब्रुवारी १९९७ रोजी पाळला गेला. १९७१ साली इराणी शहर रामसार येथे झालेल्या रामसार परिषदेत हा दिवस पाळण्याविषयी ठराव मंजूर करण्यात आला. 

भारतात मध्य प्रदेश सरकारच्या सहकार्याने भोज पाणथळ प्रदेश, भोपाळ येथे हा दिन आयोजित केला गेला. भोज पाणथळ प्रदेश हा २६ रामसार स्थळांपैकी एक आहे, जे रामसार परिषदेअंतर्गत भारतामधील नियुक्त ठिकाण आहे. 

जलप्रदेशातील जमिनी पृथ्वीवरील जैवविविधता राखण्यासाठी कश्या मदत करतात याविषयी विविध समाज माध्यमातून जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.



भूटानने गुवाहाटीमध्ये महावाणिज्य दूतावास उघडले
आसामच्या गुवाहाटी शहरात भूटानने महावाणिज्य दूतावास उघडण्यात आले आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि भूटानचे विदेश मंत्री लयोनपो दामचो दोरजी यांनी याचे उद्घाटन केले.

या महावाणिज्य दूतावास कार्यालयाचा भूटान आणि ईशान्येकडील पर्यटक, श्रद्धाळू, विद्यार्थी आणि व्यापारी यांना फायदा होणार आणि याचा मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. भूटान आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंधांना ५० वर्ष पूर्ण झाली.